अ ते ज्ञ हे ओळीने म्हणता न येणे हा मलाही अनेकांच्या बाबतीत अनुभव आलेला आहे. अगदी मराठी माध्यमातून शिकलेल्या व्यक्तींनाही हे येत नाही.  A to Z म्हणताना मात्र ह्या व्यक्तींना कोणतीच अडचण येत नाही. ही गोष्ट माझ्यासाठी धक्कादायक नसली (कारण अपेक्षित आहे) तरी अतिशय व्यथित करणारी आहे.

भाषेच्या शुद्धतेबद्दल आग्रह धरला की (भाषा शुद्ध न येणार्‍याकडून) मला अशी उत्तरे मिळाली आहेत की "मी काय म्हणतो/ते आहे ते समजतय ना? मग झालं तर! भाषा शुद्ध असण्याला जास्त महत्त्व की भावना/विचार समजण्याला?" वगैरे. पण, म्हणून अशुद्ध भाषा खपवून घ्यावी का? मी मराठींनी ह्याचे चांगले विवेचन केले आहे त्यबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार.

सध्या कार्यबाहुल्यामुळे मनोगतावरील माझा लेखनवावर कमी झाला असला तरी अजून काही आठवड्यामधे तो पूर्ववत होईल. हा विषयच असा आहे की लिहावेच लागले.

--वरदा