सगळी गोष्ट वाचून झाल्यावरदेखील कुठंतरी चुकतंय असं वाटत होतं. शेवट पटत नव्हता. ठाकुरांच्या उत्तरार्धामुळे आता ठीक वाटतो आहे.
वास्तवातले शेवट आपल्या हातात नसतात. कथेतले शेवट मात्र चांगले असावेत असं उगाच वाटतं. दोन्ही पात्रांचा मृत्यु चांगला आहे असं म्हणायचं नाही. पण निदान भूत म्हणून का होईना, नांदोत सुखाने बापडे.