शेवट आवडला नाही. बहुदा गूढकथा वाचण्याकडे माझा कल नसावा.
शक्य आहे. कथेचा शेवट सुखद असला पाहिजे असा कुठे नियम नाही. त्यातूनही आईला-मूल व मुलाला आई मिळाली तेंव्हा हा शेवटही सुखद वाटायला हरकत नाही. जगी सर्व सुखी कोण असतात हो निरुभाऊ. ;)
अस्साच शेवट केल्याने आवडला सांगणारेही भेटले. तरीही आपले प्रामाणिक मत आवडले.
तिन्हीसांजेच्या वेळेला 'झुंजुमुंजू होणं' हा शब्दप्रयोग आजवर ऐकला नव्हता. तो बरोबर आहे काय?
मला वाटत होतं की गाई-गुरे घरातून बाहेर पडण्याच्या किंवा घरी परत येण्याच्या वेळेस जेव्हा पहाटे किंवा उन्हे कलल्यावर दोन्ही ठिकाणी हा शब्द वापरता येतो. (माझी चूक असण्याची शक्यता आहे तेंव्हा चू. भू. दे. घे.)