कोणत्याही व्यक्तीच्या स्मारकाची जयंती-पुण्यतिथीलाच होणारी आठवण, स्मारकांचा जातीय फूट पाडण्यासाठी होणारा वापर, स्मारकांच्या सुरक्षेसाठी खर्च होणारा पैसा व मनुष्यबळ हे पहाता भारताला कोणत्याही नवीन स्मारकांची गरज नाही, असे मला वाटते. उलट यापूर्वी मी लिहिल्याप्रमाणे कमीतकमी भारतातले सर्व पुतळे तरी-अगदी शिवरायांचे सुद्धा- समारंभपूर्वक समुद्रात बुडवले पाहिजेत असे माझे मत आहे.  पुतळे बुडवत असताना त्यांबरोबर काही पुढारीही बुडवता आले तर अधिक उत्तम!