दुव्याबद्दल आभारी आहे.
तसंही 'देव शाकाहारी असावेत', 'देवाच्या दिवसांत कांदे खाऊ नये / मांसभक्षण करू नये' वगैरे अपेक्षा / नियम कोणी (आणि कशाच्या आधारावर) ठरवले?
दुसऱ्या शब्दांत, देवांनी कोळंबी खाऊ नये असं कोण म्हणतं? आणि का खाऊ नये? देवांवर हा निर्बंध कोणी लादला? कशासाठी?
आणि एखाद्यानं नाही खायचं तर कधीच खाऊ नये. किंवा खायचं तर कधीही खावं. एरवी खाल्लं आणि फक्त 'देवाच्या दिवसांत' नाही खाल्लं, तर ती देवाची फसवणूक नाही काय?
- टग्या.