माझ्यासाठी ही केवळ निरर्थक चर्चा आहे.

अहो हेच तर सांगण्यासाठी केला होता वरचा सगळा अट्टाहास!

चर्चा निरर्थकच आहे, पण तरीही कोणी मांडली आहे, तर टोलवून नको का द्यायला? चर्चा मी नव्हती सुरू केली; पण कोणी केलीच सुरू, आणि काहीबाही मुद्दे मांडले, तर खंडन नको करायला?

१३. थंड प्रदेशांमध्ये 'मांसभक्षण' करून शरीरात ऊब आणता येते. म्हणून तेथे 'मांसभक्षण' केलेच पाहिजे.

केलंच पाहिजे असा काही कायदा नाही. (धर्मतत्त्वही नाही.) न करता जगता येत नाही, असंही नसावं. पण घाऊक भावात, वैयक्तिकपेक्षा सामाजिक पातळीवर विचार केल्यास मांसभक्षण कदाचित अधिक व्यवहार्य ठरत असावं, इतकंच!

कदाचित आपण म्हणता तसं मोठ्या प्रमाणावर शेतीही अव्यवहार्य ठरत असावी, म्हणूनही असू शकेल.

असाच भारतात दारू/अल्कोहोल मिश्रीत पेयांचे समर्थन कितपत योग्य हा सुद्धा एक चर्चेचा विषय बनू शकतो.

माझ्या लेखी हाही तितकाच निरर्थक चर्चाविषय आहे. ज्याला जे आवडतं त्यानं ते प्यावं; ज्याला आवडत नाही, त्यानं पिऊ नये. समर्थन नसावं, बंदीही नसावी. (तसंही सरकारला दारूचं/अल्कोहोलमिश्रित पेयांचं समर्थन करण्याव्यतिरिक्त इतर चांगले उद्योग असावेत. दारूबंदीबद्दलही हेच म्हणता येईल.) फक्त दारूच्या अमलाखाली कोणी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालू नये (drunken and disorderly conduct, creating a public nuisance) किंवा दारूच्या नशेत वाहन चालवू नये याकरिता कायदे असावेत - आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणीही व्हावी. थोडक्यात दारू पिणे हा गुन्हा नसावा; मात्र दारू पिऊन इतरेजनांचे / सार्वजनिक नुकसान केल्यास ते शिक्षापात्र वर्तन ठरावे. एरवी हा ज्याचात्याचा खाजगी मामला आहे.

- टग्या.