मराठी जेवणाचा आपण मिरचीशिवाय विचारच करू शकत नाही, मग पूर्वी जेवणातले मुख्य पदार्थ कोणते होते? ते कसे बनवीत असत?

मराठी काय ? भारतातील कुठल्याच प्रांतातील जेवणाचा विचार करू शकत नाही !

मलाही प्रश्न पडला आहे. पूर्वीचे लोक भाजी, आमटीत पण मिरपूड घालत असत की काय ?? आणि तीच मिरी, मसाले वगळता 'रोजच्या स्वयंपाकातून' इतकी कशी काय हद्दपार झाली ? खरोखर पोर्तुगीजांनीच भारतात मिरची आणली का ? आणि जी मिरची आणली ती आपली नेहमीची तिखटासाठी वापरात येणारी मिरची की भोपळी मिरची ? की पोर्तुगीज इथे पोचण्यापूर्वीही समुद्रमार्गे मिरची भारतात पोचत होती ?