तुमचे अश्या विषयांवरील लेख उत्तम असतात हे सांगणे न लगे. पण जवळपास प्रत्येक लेखात गांधींवर टोमणे मारून तुम्हाला काय मिळते? प्रत्येक लेखाला गालबोट लावायलाच हवे काय?

चित्त व त्यांच्या प्रतिसादात उद्धृत केलेल्या भांडारकरांच्या वाक्यांशी सहमत.

लेख ते एक विधान सोडता आवडला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे ही कोणा एकाची मक्तेदारी होती असे वाटत नाही. सर्वांचे joint efforts या कामी आले.

गद्यविभागात अशाप्रकारे चर्चा सुरू करून लेखकाला खच्ची करण्यापेक्षा (साक्षी खच्ची होणार नाहीत असेच मानून) इथे निषेध नोंदवून वेगळी चर्चा, चर्चा विभागात सुरू करावी असे मला वाटते.