१८९३च्या या कार्यक्रमाचे नाव "सर्वधर्मसंसद" असे होते. त्यात सर्व धर्माचे प्रतिनिधी हजर होते आणि आपणच फक्त कसे शहाणे एव्हढेच  बोलत होते. त्यात मुसलमानांचेच काय हिंदू धर्माचे पण "अधिकृत" प्रतिनिधी त्याच आवेशात बोलत होते. स्वामी विवेकानंदांचे वैशिष्ठय हे की त्यांनी खरा धर्म म्हणजे काय ते समजावून सांगितले - कर्मकांड म्हणजे काय ते नव्हे.

स्वामी विवेकानंदाच्या इथल्या विजयाची तुलना मला ज्ञानेश्वरांच्या भिंत चालवण्याच्या चमत्काराशी कराविशी वाटते. त्यातील गोष्टीचा म्हणून खरेखोटेपणा सोडून द्या. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या गुरूच्या आज्ञेप्रमाणे विनय न सोडता पण सडेतोड असे उत्तर चांगदेव या तत्कालीन ज्ञानी पुरूषाला दिले. परीणामी विरोधक पण आपोआप ऐकायला लागले... दोघांनीही "स्लो पॉयझनिंग" ऐवजी पुढच्या अनेक शतकांसाठीचे "स्लो अमृतिंग" (!) केले - आपापल्या गुरूची आज्ञा शिरसावंद्य मानून...  

http://www.encyclopedia.chicagohistory.org/pages/11489.html