चाणक्यांशी सहमत,

'फळ दिसले म्हणून खाल्ले,दूध उघडे होते म्हणून पिले,शेत आकर्षक वाटले म्हणून नांगरले' अशा वाक्यांमध्ये (मालकाची इच्छा नसताना,दडून,कायद्याचे उल्लंघन करून)  हे कंसात असते. बीळ उघडे दिसले  म्हणून  नागिणीची इच्छा नसताना तीच्याच बिळात जाऊन अत्याचार करणे  सर्वस्वी गैरच असते.

निसर्गातच आकाशातल्या तारकांपासून छोट्यात छोट्या कणांत,काजू पासून बदामा पर्यंत,ऊस पासून नागोबा पर्यंत ऍपल पासून केळी पर्यंत कोणतीही कल्पना कामुक  भावना चाळवू शकते त्याला त्वचेचे दर्शन आवश्य्अक नाही.

आणि थोड्याशा नेत्रसुखाने स्वप्ने रंगवणारा पुरूष , अप्सरा जरी वस्त्रहीन समोर उभी टाकली तरी वासनाधीन होईलच असे नाही.

स्त्रीस देवत्व द्यायचेच असेल तर ते तीच्या संपूर्ण  अभिव्यक्तीच्या आणि वैषयीक स्वातंत्र्या सहीत असावे . आरोग्याची काळजी घ्यावी इतर सर्व मुल्य व्यवस्था जपावी. 

बलात्कारा झालेल्या स्त्रीला समाजातील आणि कुटुंबातील स्थान अबाधित राहणे महत्वाचे आहे.तसे न करणे  हे बलात्काराच्या मूळ गुन्ह्यापेक्षा देखील भयंकर असते.जरूर तिथे संबंधित स्त्रीला आधुनिक मानसशास्त्राचे पाठबळही आवश्यक आहे.

गुन्ह्याचा शोधात व न्यायप्रणालीत अत्याधुनिक तंत्रज्ञान  वापरले जाणे आणि संबंधित  स्त्रीने न्यायालयात आणि  सर्वच स्त्रीवर्गाने संपूर्ण लैंगिक विषय नेहमीच्या जीवनात मोकळे पणे हाताळणे  गरजेचे आहे.

 

पा.पा.