एखाद्या वाक्याचा अर्थ प्रत्येकजण कुवतीनुसार घेणार. त्यामुळे गैरसमज होतात, होतीलही.१००% सहमत.
गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे, अधिक स्पष्ट लेखन करणे व इतरांना सुद्धा तसे प्रयत्न करायला सांगणे हा आज माहितीजालावर वावरण्याच्या व्यक्तिसापेक्ष संस्कारांचा भाग होऊ शकतो.
असहमत. एखाद्या शब्दांत खोडसाळपणा आढळून येत असेल तर अशा गोष्टींचे निराकारण करण्याची समोरच्याला गरज आहे असे वाटत नाही. त्याने ते करावे की न करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
आता माझ्या मूळ प्रतिसादा बाबत आणि आपल्या उपप्रतिसादाबाबतः
मी माझ्या मूळ प्रतिसादात माझे व्यक्तिगत मत लिहीले आहे. त्यात कुठल्याही ज्ञानाला कमी लेखलेले नाही. (मी स्वाहीली शिकलेले नाही आणि माझ्या व्यक्तिगन जीवनात त्याचाही मला काडीचा फायदा/नुकसान झालेले नाही. याचा अर्थ इतरांना तो होणार नाही असा होतो का?) पाठांतर, कमीपणा यांचा उल्लेखही नाही. एखाद्याला एखाद्या गोष्टीचा उपयोग झाला की नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे. त्यासाठी त्याने 'तुम्ही असे करू नका' हे इतरांना सांगण्याची गरज नाही. तसे मी मुक्ती ताईंना सांगितलेलेही नाही. इतरा कुणाला सुचवलेलेही नाही.
आपण काय केले? तत्सम = तत्+सम=त्यासमान= so called???? असा अर्थ लावून त्यावर भाषण केलेत. जसा आपण माझ्या प्रतिसादातून हवा तो अर्थ काढलात तसा मलाही आपल्या प्रतिसादात 'खोडसाळपणा' दिसू शकतो. अशा गोष्टींना उत्तर द्यावे की न द्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बरेचदा उत्तर न देण्यातच शहाणपणा आणि सुसंस्कृतपणा असतो. विशेषतः जर वाक्ये चिथावणीखोर असतील तर.
म्हणून म्हटल की गोष्टी सापेक्ष आहेत. प्रत्येकजण आपल्या समजाने वागत असतो.