पत्राच्या सुरूवातीला येणारे चिरंजीव हे विशेषण म्हणून वापरले आहे आणि म्हणून चिरंजीवी होणार नाही. खालचे स्पष्टीकरण पहा पटते का.

  1. आपण आपल्या शिक्षकांना पत्र लिहीताना माननीय/ आदरणीय जे काही लिहीता ते लिहीताना, माननीय देशमुख गुरुजी ( सर ) असे लिहाल. पण हेच पत्र जर देशमुख बाईंना (मॅडम) ना लिहायचे असेल तर माननीया लिहीणार का?
    वाचून पहा
    माननीया देशमुख बाई (कानाला खटकते, तसेच चिरंजीवीचे झाले) आणि हे मराठीत चूक आहे. 
  2. आई व वडील दोघांना तीर्थरूप लिहीतात, ते विशेषण आहे म्हणून दोघांना सारखेच लिहीतात. हाच नियम तीर्थस्वरूपला लागू होतो.

    आता टग्या यांना शंकेस जागा उरणार नाही असे वाटते.  मुलीला सुद्धा चिरंजीवच लिहावे याची माझी खात्री झाली आहे.

 अवांतर

चिरंजीव हा मूळ शब्द 'विशेषण' आहे. मोल्सवर्थ् चा शब्दकोष आपण दिलात. आमच्या जवळच्या शब्दकोशाची प्रत जाळ्यावर आहे की नाही ते माहिती नाही. चिरंजीव ह्या शब्दाचा अर्थ असणारे अमर, अविनाशी, प्राचीन ,पुरातन शब्द सुद्धा विशेषण म्हणून वापरले जातात. अशा वेळी विशेषणाचे लिंग न बदलता , त्यापुढे येणाऱ्या नामाचे रूप बदलणे आवश्यक आहे,

जसे चिं चिन्मयला किंवा चिं चिन्मयीस... (चिन्मयीस हा बदल प्रियालीताईंनी  केला आहे.)