शब्दसंपदा चांगली असल्यास उत्तम पण शब्द उगाच यायला नको. विस्कळीतपणा घालवण्यासाठी अधिक मेहनतीची गरज आहे हे सांगणे न लगे.
शुष्क पाने गाळलेली
वादळाने स्वैर नेली।
आता वादळ ह्या शुष्क पानांना शिस्तीत नेणार नाही.
एकही अश्रू उषेचा
नभाने गाळला नाही।
सारख्या ओळी छान आहेत.
केवड्याची मोगऱ्याची
गंधगाथा दूर गेली
छान. पण पुढे
उरातल्या भावनांची
रोज झाली पायमल्ली।
हे नेहमीचे. रडू आणि महाविद्यालयीन.