<<मराठी माणूस स्वतःच्याच डबक्याच्या बाहेर यायला तयार नसतो.>>

हे काही काळापूर्वी खरे असेल पण आता मराठी माणूस कुठेही जायला तयार असतो.

अर्थात 'कुठेही' ह्याचा अर्थ

अ) जेथे चांगल्या संधी उपलब्ध आहेत,

ब) जिथले राहणीमान त्याच्या सध्याच्या परिस्थितीपेक्षा चांगले आहे आणि

क) जिथे त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे पुढचे आयुष्य सुरक्षित, स्थिर आणि सुखी असेल.

आता ह्या गोष्टिंचा विचार जगातील कोणताही स्थलांतर करणारा प्राणी करतो. आता इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र कायमच प्रगत आणि सुरक्षित होता (आणि अजुनही बऱ्याच प्रमाणात आहे). तेव्हा मराठी माणसाने इतर राज्यांत काय म्हणुन जावे? 

परदेशात तर मराठी लोक आधीही जात होते पण आता चांगल्या संधी इतर राज्यांमधेही मिळायला लागल्यात तसे मराठी लोकही परराज्यांत जाऊ लागलेत. 

तसे पाहिले तर महाराष्ट्राचा विकास हा मराठी लोक महाराष्ट्रातच राहिल्यामुळे झाला. माझ्यामते खरा धोका परप्रांतिय इथे स्थलांतरीत होण्यापेक्षा मराठी माणुस परप्रांतात (किंवा परदेशात) स्थलांतरित होण्यात जास्त आहे. ब्रेन ड्रेन देशालाच नाही तर प्रत्येक राज्यालाही तितकेच घातक आहे.

डबक्याचे नंदनवन डबक्यात राहुनच करता येईल, डबक्या बाहेर राहून नाही फक्त तसा द्रुष्टिकोन हवा. आपणच आपल्याला शिव्या घालण्यात काय अर्थ आहे.