भारताचे सोडा, माझ्या मते ह्या दुनियेवर प्रत्येक माणसाचा सारखाच हक्क आहे. अनिवासी उत्तर प्रदेशी, अनिवासी बिहारी आणि अनिवासी भारतीय ह्यांच्यात तसा काहीच फरक नाही. अनेक अनिवासी भारतीय गेले तिकडचेच झाले आहेत, होत आहेत. तीच गोष्ट अनिवासी बिहाऱ्यांची, यूपीवाल्यांची.

चित्तरंजन

अवांतर:
मराठ्यांच्या, पेशव्यांच्या काळात अनेक मराठी कुटुंब उत्तर भारतात स्थायिक झाली. बडोदा, झाशी, सागर, ग्वाल्हेर, इंदूर आदी शहरांत मराठी लोकांची संख्या लक्षणीय का बरे आहे? अगदी कुमाऊसारख्या भागातही मराठी लोक गेले आणि तिकडचेच झाले. गोविंद वल्लभ पंतांचे घराणे मूळचे महाराष्ट्रातले.असो.