मराठी भाषिक राज्य झाले आहे. आंदोलने झाली ती मुंबईला महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी. ती तशी आहे. मुंबईकरांनी भरलेला कर इतर महाराष्ट्रात वापरता येऊ शकतो आहे. आणखी बिनमराठी लोक आले तरी तेही महाराष्ट्र सरकारालाच कर भरतील!
आमच्या छोट्या साताऱ्यात देखील आता 'बाहेरचे' लोक यायला लागले आहेत. पण एकूण हिंदी किंवा इंग्रजी बोलण्याचा आनंद असल्याने ते आपोआप मराठी शिकताहेत. चुकत माकत बोलताहेत. जर ते मराठी माणसापेक्षा कष्टाळू असतील, कमी पैशात काम करत असतील तर ते टिकणारच. भारतीय वंशाचे लोक इथे इंग्लंडात टिकतात तसेच.
बलिदान असा शब्द बरोबर आहे. तुम्हाला मराठीची कळकळ असेल तर कृपया शु. चि. वापरूनही ती दाखवून द्यावी.