गुजराती, पंजाबी किंवा दाक्षिणात्य लोकही (जगात कुठेही) कळप करूनच राह्तात, नाहि का. पण 'त्यांचे नेटवर्क किती चांगले असते', 'ते एकमेकांना किती मदत करतात' असे बोलून त्यांचे एकप्रकारे कौतुकच होत असते. मग परदेशात गेलेले मराठी लोक (जे आधीच स्थलांतरित, मातृभुमिपासुन दूर गेले आहेत) एकत्र जमतात किंवा तुमच्या मते कळप करुन राहतात तर ते अगदी स्वाभाविक आहे.
आत्तापर्यंत मी बऱ्याचदा वाचले किंवा एकले आहे की मराठी माणुस महाराष्ट्र सोडुन बाहेर जायला फ़ारसा उत्सुक नसतो आणि म्हणुन त्याच्या नावाने तो डबक्यात राहतो वगेरे अशी बोटे मोडण्यात आली आहेत (=शिव्या घातल्या = नावे ठेवली). (डबके हा शब्द तुम्ही नक्किच मराठी माणसाचे कौतुक करायला वापरला नाहित.) आता अमेरिकेत जाऊनही लोक जर पुन्हा डबक्यातच (कळपातच) राहतात (हे मला नवीन आहे) तर मग काय बोलायलाच नको. आता ह्या (अमेरिकेत कळपात राहणाऱ्या मराठी) लोकांनी आणखी कोठेतरी स्थलांतरित व्हावे आणि पुन्हा अमेरिकन डबक्यातच सुधारणा करायला परत यावे (!) हे तुम्हाला अपेक्षित असेल तर मी चुकीच्या ठिकाणी प्रतिसाद देत आहे.
<<मला जे मराठी समाजाचे दोष वाटतात ते बोलून दाखवणं याला शिव्या म्हणायच्या असतील तर मग सुधारणेचा विषय विसरूनच जाऊया.>>
मलाही समजते की बाहेर गेल्या शिवाय, जग पाहिल्याशिवाय स्वतः मधे सुधारणा होणार नाही. आणि जग पाहिल्यावर परत महाराष्ट्रात येणे हे मला ('डबके' सुधारण्यासाठी!) अपेक्षित होते. (वास्तविक 'डबके' हा शब्द मी वापरला नसता.)
मराठी समाजाचे दोष बोलून दाखवणं याला मी शिव्या देणे (किंवा नावे ठेवणे) म्हणत नाही. मलाही तुमच्याइतकीच मराठीसमाजबद्दल आस्था आहे. पण बऱ्याचदा दुसऱ्यांसाठी जो गुण ठरतो तो आमच्यासाठी दुर्गुण का ठरावा हे खटकले.