एकलव्यजी,
या परीक्षा (ग्रंथालय व माहिती शास्त्र विषयातील
प्राध्यापक पदासाठी) मी स्वतः तीनदा दिल्या आहेत, देव पावला
नाही ही गोष्ट वेगळी; पण परीक्षा अवघड नाहीत हे जाणवले. पण या परीक्षांची
पद्धत मला चुकीची वाटते.
१) आजपर्यंत १०० गुणांची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी ३ तास वापरण्याची
सवय लागलेली आणि सेट-नेट मधील २०० गुणांच्या तिसऱ्या
प्रश्नपत्रिकसाठी दिला जाणारा वेळ मात्र अडीच तासांचा, ही गोष्ट विचित्र
वाटते.
२) पहिल्या
प्रश्नपत्रिकेत(प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रच असते)
किमान काही गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचीच दुसरी उत्तरपत्रिका
तपासली जाते. तोच निकष वापरून
तिसऱ्या
उत्तरपत्रिकेचा विचार केला जातो. त्यातही विशिष्ट इतके ( माझ्या माहितीनुसार किमान
५५ %) गुण मिळविणाराच उत्तीर्ण समजला जातो.
उरलेले सर्व नापास ठरतात. यातील दुसऱ्या मुद्याविषयी तडजोड होऊ नये, पण
२०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेच्या वेळेत काही सुधारणा व्हावी असे वाटते.
अवधूत.