२. पहिल्या बाळंतपणा नंतर मुली अचानक थोराड वाटू लागतात. म्हणून त्यांचे वय लग्नाच्या वेळेस मुलापेक्षा २-३ वर्षे कमी असावे.

आदिती गोवित्रीकर, काजोल इ.न विचारावे लागेल.

३. घरच्यांची आणि नातेवाईकांची सुप्त इच्छा असते की आपल्या मुलाने कमी वयाच्या मुली बरोबरच लग्न करावे किंवा प्रेमात पडावे. याउलट जास्त वयाच्या मुली बरोबर प्रेम झाले तर मुलीनेच याला गळाला लावला अशी चर्चा सुरू होते किंवा घरच्यांकडून विरोध होतो.

रमेश तेंडुलकर हयात नाहीत त्यांच्या पत्नीला विचारावे लागेल.

४. मुलगी १-२ वर्षे मोठी असेल तर ठीक आहे. पण ५-६ वर्षे मोठी म्हणजे आंधळे प्रेम होय. मग घरातून विरोध झालाच समजा. याबाबतीत एक अनुभव असा की नेमके हेच केलेल्या मुलाशी त्याच्या घरच्यांनी संबंध तोडून टाकले.   

सचिन तेंडुलकरला विचारावे लागेल.

५. जर मुलगी मुलापेक्षा मोठी असेल तर, ती मुलापेक्षा विचारांनी जास्त प्रगल्भ असतात. याउलट कमी वयाच्या मुलींमध्ये अल्लडपणा जास्त असतो. त्यामुळे जास्त वयाची मुलगी असणे हे फायदेशीर आहे.

सलमान रश्दींना विचारावे लागेल की पद्मा अल्लड आहे का?

६. मुलगी वयाने ५-६ वर्षे मोठी पण विधुर/घटस्फोटित असेल तर तिच्याशी लग्न करायला काही हरकत नाही. पण तिला जर मुले असतील तर हा एक मूर्खपणा आहे.

ऍश्टन कुचरला (डेमी मूरचा नवरा) विचारावे लागेल.

बाकीचे प्रश्न कोणा कोणाला विचारावे यावर विचार सुरू आहे. सुचले की कळवते.