अशा प्रकारे नैसर्गिक कायद्याना झुगारुन मानव स्वतःचे कायदे निर्माण करून काय साधतो?
*भेदाभेद न मानणाऱ्याचं मानसिक बळ आणि कायदेशीर बळ जास्त असेल तर सर्वांना समता,समृद्धी,आणि सुव्यस्थेचा लाभ होतो.
*हा लाभ घेऊन भेदाभेदाच्या बाजूने बोलता लिहिता येण्याचे स्वातंत्र्यही उपभोगता येते.
भारतातील भेदाभेदांच्या या मूठभरांच्या अमंगळ सनातनतेने भारतातील मोठ्या लोकसंख्येला परधर्मांचे आश्रित बनवले.परकीय सत्तांना सैन्या करिता सहज माणूसबळ उपलबद्ध होऊ दिले.एवढा देशद्रोह झाला.
मुंगी आणि हत्तीच्या गोष्टीतले मुंगीचे,उंदीर आणि सिंहाच्या गोष्टीतील उंदराचे महत्त्व या सनातनांनी कधी उमजूनच घेतले नाही.
तोंडातून फुकाची हवा दवडून स्व-जातीस नाहक बदनाम केले आहे.
हि हलके घेण्याची गोष्ट नाही.