मोरू,

विषय चांगला आहे. उत्तर कठीण आहे. हे म्हणजे तुला आई आवडते का बाबा असे आहे.

गांधींनी टिळकांचा हात पकडून लोकप्रियता मिळवली आणि त्यांच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळेल असे लोकांना वाटल्याने ते जास्त प्रभावकारी ठरले. त्यातूनच ते एक प्रस्थापित सुद्धा बनले. त्यांची सर्व मते चूक वा बरोबर नव्हती. तसेच इतरांचे ही. पण प्रस्थापितां विरुद्ध बंड पुकारणे नेहमीच एक मोठा जुगार असतो. जमला तर तुम्ही महान वा कंगाल.

गांधीजींचा प्रभाव आणि त्यांची फळी एवढी मोठी होती की सावरकर हे लोकांना त्यांचे विरोधक वाटले. काँग्रेसचा प्रभाव आजच्या पेक्षा खूपच जास्त होता त्यामुळे हा विरोध साहजिकच देशद्रोह ठरला. आज लोकांना कॉग्रेस नको झाले आहे कारण ते आज फक्त राजकारण करतात समाजकारण नाही.

सावरकरांची मते आज लोकांना पटू लागली आहेत. सावरकरांनी स्वातंत्र्या नंतरचा भारत हा हिंदूंचा असावा आणि हिंदू कसे असावेत ही मते जहाल प्रकारे मांडली. ती बहुजनांना त्यावेळी पटली नाहीत. आज कॉग्रेसचे राजकारण पाहून आणि फाळणी नंतरचा जास्त विकसित न झालेला भारत पाहून लोकांना सावरकरांची मते जास्त पटू लागली आहेत.

लिहिण्यासारखे खूप आहे. जमेल तसे लिहीन.