कुठलीही व्यक्ती, तिची मते किंवा विचारसरणी ही संपूर्णतः (१००%) बरोबर किंवा चूक नसते. प्रत्येक व्यक्ती तिच्यावर गुदरलेल्या परिस्थितीनुसार आणि अनुभवांवरून आपापले विचार, तत्त्वज्ञान ठरवत असते.

त्यातूनही एकच परिस्थिती दोन किंवा अधिक व्यक्तींवर येऊन पडली किंवा दोन व्यक्तींनी एकच अनुभव घेतला असता या दोन्ही व्यक्ती तंतोतंत एकमेकांसारख्याच वागतील असे म्हणता येत नाही.

गांधी किंवा सावरकर यांचे विचार कुठल्या परिस्थितीत आपल्याला लागू पडतात हे ठरवून ते तसे स्वीकारावेत.

यांत कुठेही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वरचढ आहे किंवा कमी आहे असे मला वाटत नाही. तसा वाद घालणे हे मला फुटकळ वाटते.

असो.

अवांतर: 'मोरू' हा शब्द, शब्दभांडारात घालण्याविषयी कुठेतरी वाचनात आले होते. या विशेषनामाचे सामान्यीकरण होत असल्यास 'मोरूगिरी' या शब्दाची व्याख्या करून त्यालाही शब्दभांडारात जागा घेता यावी असे वाटते. (ह. घ्या)