गांधीगिरी व सावरकरगिरी हे दोन्ही दोन टोके वाटतात.
एक टोक अती थंड, संथ, अहिंसेचा अतिरेक तर दुसरे टोक उष्ण, जहाल मातावादी वाटते.
परिस्थिती नुसार वागणे जास्त शहाणपणाचे वाटते.
उदा:
एखादा मनुष्य जर आपल्या डोळ्यासमोर एखाद्या स्त्रीची अब्रू लुटत असेल तर:
गांधीगीरीचा वापर करून शांत मार्गाने जाण्याचा प्रयत्न करावा.
जर गांधीगीरीचा उपयोग होत नसेल तर सावरकरगिरी जरूर वापरावी.
श्री रामाने सुद्धा रावणाला युद्धा पूर्वी शरणयेण्यास मुदत दिली होती.
श्री कृष्णाने युद्धा पूर्वी शांतिदूताची भूमिका धेतली होती.
म्हणजे, सावरकरगिरी पूर्वी गांधीगिरी करण्यास हरकत नाही.
पण गांधीगिरी किती वेळ करावी याला मर्यादा असावी.