वरील प्रश्नांमुळे उगाचच विषयांतर होत आहे, पण उत्त्तर देणे महत्त्वाचे वाटले म्हणून देत आहे. वाद घालण्यासाठी म्हणून नाही:
१) आपल्या पैकी किती जणांनी खरोखरच किती अस्पृश्य मीत्र जोडले ?
शाळे पासून सर्व प्रकाराचे मित्र होते. कधी जाती पाहील्या नाहीत. अस्पृश्य हा शब्द फक्त वादात अथवा वाचनातच आला आहे, वापरात नाही. मधल्या सुट्टित फ़्रिजमधील पाणि प्यायला (विशेष करून उन्हाळ्याच्या सुरवातीस, सुट्टी चालू होयच्या आधी) कायमच सर्वजण येयचे. इंजिनियरींगला असतानापण मित्र होते, नंतर अमेरीकेतही होते. त्यात काही नवल नाही. नवल एका गोष्टीचे सांगतो, स्वातंत्र्याच्यापुर्वीही गावामधे, माझी आजी त्याकाळी खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतल्या बायकांना बाळंतपणानंतर मुद्दामून मदत करत असे - कारण त्यांना कोणी नसायचे म्हणून...कामकरी बायका आमच्याकडे गौरीचे जेवण जेवायच्या आणि त्यांची ओटीही भरली जायची (आईने त्यांना नमस्कार करून), वगैरे. आजही मी भारतात गेलो की काम करत नसूनही भेटून जातात.
२) चातुर्वण्यावर विश्वास ठेवू पण तथाकतीत पुरस्कार कर्त्यांनी किती जन्मानुसार ब्राम्हण असुनही वेगळा व्यवसाय केला म्हणून जन्माने मिळालेले ब्राम्हणत्व सोडले? कुणी परिचयात आहे तुमच्या?
ब्राम्हणत्व म्हणजे काय? पिढ्यानपिढ्या घरातून चालू असलेल्या परंपरा कालानूरूप बदल करूनही आणि कुणाला कमी न लेखता चालू ठेवल्या म्हणून काही गैर नाही. वेगळा व्यवसाय म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला? तुम्ही तुमच्या परंपरा/संस्कार चालू ठेवताना?
३) किती ब्राम्हणांच्या देवघरात वीष्णु अवतार वराह आणि गौतम बुद्ध यांच्या मुर्ती आहेत?
घरात जे कोणी ज्या कुठल्या मुर्ती देतो त्या ठेवल्या आहेत. तुम्ही वराहाची द्या किंवा बुद्धाची द्या आनंदानी देवघरात ठेवीन. तुमच्याकडे बोलावले तर आनंदाने नव्हे अगदी श्रद्धेने कुठल्याही देवास नमस्कार करीन. तसे विक्रोळीला गेलोही होतो - कॉलेजमधल्या एका मित्राच्या घरी पुजेला आणि जेवायला. मधे एका ख्रिश्चन मित्राच्या आईच्या अंत्यविधिला चर्चमधे गेलो होतो. कॅथलीक पद्धती प्रमाणे नंतर ब्रेड आणि वाईन देयला लागले ज्यात त्यांच्या श्रद्धेप्रमाणे येशूचे शरीर आणि रक्त असते आणि जे कोणी घेईल तो कॅथलीक होतो अशी श्रद्धा असते. माझी एक त्याच धर्मातील सहचारीणी मला थांबवायला लागली की माझ्या भावना / श्रद्धा दुखायला नकोत म्हणून. पण तसा काही मी थांबलो नाही. ते घेऊन त्या व्यक्तिचा आदर ठेवता ठेवता कॅथलीक झालो का ते माहीत नाही पण खरा हिंदू असल्याचे निदान स्वतःपुरते सिद्ध केले. (असे आधी पण त्यांच्या एका सणाला केले आहे). मुसलमानाकडे पुण्यात आणि बॉस्टनमधे ईद्साठी बोलावले तर आनंदाने गेलो. पुण्यात कामगार होता (झोपडीतील) तर बॉस्टनमधील सुशिक्षित. म्हणून त्यांचे आचरट लाड मान्य नाहीत. बॉस्टनमधील व्यक्तिस तर हिंदूत्ववादी विचारही माहीत आहेत आणि त्याचा परीणाम कधी झाला नाही.
४)आपल्या संबधीतात किती जन्माने ब्राम्हण स्त्रीने व्यवसायाने ब्राम्हण (प्रोफेसर वगैरे) दलितांशी विवाह केला आहे?
जवळच्या नात्यात नाहीत, लांबच्या नात्यात आत्ता तरी आठवत नाही पण ओळखीत माहीत आहेत आणि ते ही कुठलाही विरोध न होता झालेले.
तात्पर्य: हे सर्व लिहीले म्हणजे मी काही आदर्श नाही, आत्मप्रौढी नाही, पण जसे असायला हवे तसा आहे. मला खात्री आहे, आपल्यातल्या बऱ्याचजणांना असा अनुभव असेल आणि योग्य ते वागलाही असाल. याचा अर्थ काही पुर्वी दोष नव्हते असा नाही. ज्या ब्राम्हणांनी अस्पृश्यता तयार केली, त्यांनीच ज्ञानेश्वर आणि भावडांना त्रास दिला. पण त्यांनी काही त्याचा राग मनात धरला नाही तर "जिभ दातांनी चावली कोणि बत्तिशी तोडीली" असा स्वतःच्या धाकट्या बहीणीची समजूत ऐकत आणि मोठ्या भावाला गुरू करत नाथ संप्रदायी होत (जे जाती पाळत नाहीत) सर्वांना एक करणारा कालानूरूप भागवत संप्रदाय काढला. त्यातून विठ्ठलाच्या भक्तिने आणि प्रेमाने वाऱ्या चालू केल्या मोर्चे नाही काढले.
तेंव्हा पालापाचोळा साहेब उगाच काहीतरी कुरापती काढू नका आणि स्वतःच्या मनात किंवा इतरांच्या विचारात चुकूनही विष कालवले जाणार नाही याची काळजी घ्या.
धन्यवाद