प्रिय मित्र नाम्या,
आपले उत्तर वाचून आनंद वाटला.'यात घरचा गालिचा बाहेर का धुतला जातो' असा आशय नसावा असा विश्वास आहे. प्रथमतः आम्ही विषयांतर नव्हे फक्त सावरकरकरगिरी केली.दु:खाचा भाग असाकी ती सावरकरांच्या अनुयायांशीच करावी लागते.सावरकरांचा विज्ञानवाद खऱ्या अर्थाने पाळणारे अनुयायी फारच थोडे आहेत.आपण स्वतः पुरोगामी विचाराचे म्हणूनच अपवाद आहात असे दिसते.
आमचा विरोध जन्माने ब्राम्हण समाजाने चांगल्या परंपरा चालू ठेवण्यास नाही.'पूर्वीच्या जन्मी तुम्ही पाप केले म्हणून तुम्ही क्षुद्र वर्णात जन्मला' या व्याख्येचा विरोध करण्याच्या दृष्टीने सनातनवाद्यांना हा प्रश्न आहे. सावरकरांचा विज्ञानवाद त्यांच्या हयातीतसुद्धा सर्व हिंदू संघटनांनी स्वीकारला नव्हता हे इतिहास सांगतो.
'ब्राम्हणाचा मुलगा मेला म्हणून रामाने तपस्वी क्षुद्र मारला', हे तुम्ही खोटे मानता आम्ही मान्य करतो̱.
घरच्या सत्यनारायणाच्या पूजेला जन्माने दलित विधी सांगणारा ब्राम्हण मिळाला नाही हे मान्य करतो.आजही आपल्यातील असंख्य 'जन्माने' ब्राम्हण साधे जानवेही न वापरणाऱ्या 'ब्राम्हणांना' सणांना घरी जेवण घालतात त्यावेळी किमान नाम्याजी आपल्या घरी एक पूर्वाश्रमीचा दलित जेवण करो आणि आपणा सर्वांच्या नात्यात पूर्वाश्रमीचे दलितही असतील तो सुदिन येवो ,आणि हिंदुत्व पुरोगामी आणि विज्ञानवादावर आधारीत चांगल्या परंपरा पाळताना वाईट धुवु शकले तर ते चिरायू होवो हि शुभेच्छा.
पा.पा.