आपल्या आदरणीय राष्ट्रपतींनी म्हटल्याप्रमाणे, "क्षमा बलवानालाच शोभून दिसते. दुबळ्यांच्या क्षमेला काहीच अर्थ नसतो." कारण दुबळा फक्त क्षमाच करू शकतो. त्यामुळे आधी बलवान व्हावे. आपणही समोरच्याला शिक्षा देऊ शकतो एवढा धाक त्याच्या मनात निर्माण करावा मगच त्याला क्षमा करावी. मला वाटते हीच सावरकरांची भूमिका आहे.
सर्व संतांचीही हीच भूमिका होती. तुकाराम महाराज म्हणतात "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी." "समर्थ" रामदासांनी गावोगाव मारुती मंदिरे स्थापन करून बलोपासनेला प्रोत्साहन दिले. मध्वाचार्यांनी सुद्धा ईश्वरपूजने इतकीच बलोपासना श्रेष्ठ मानली आणि आपल्या शिष्यांमध्ये ती रुजवली.