चर्चेत उल्लेखलेले 'विचार' एका इमेलातून आले होते. मला वाटते कोणी आंधळ्या गांधीविरोधकाने ते इमेल तयार केले असावे.
या दोन्ही नेत्यांबद्दल मला सारखाच आदर वाटतो. तरी गांधी हे सावरकरांपेक्षा जास्त हुशार राजकारणी होते असे वाटते. त्यांनी शत्रूपक्षाचा (इंग्रज) विश्वास संपादन करून टेढी उंगलीसे घी काढून घेतले. शिवाय शांततापूर्ण मार्गाचे पेटंट मिळवले. हजारोंच्या संख्येने अनुयायी निर्माण केले. सावरकर बुद्धिमान होते नक्कीच. पण हाडाचे राजकारणी नसावेत. (दुसरे हाडाचे राजकारणी, तसेच बुद्धिमान गृहस्थ म्हणजे आपले बाळ गंगाधर!)