सुहासिनीताई,
अनुवादाबद्दल आभार. याआधीच्या चर्चेत आम्ही सगळे ज्या प्रश्नांची उत्तरे शोधत होतो, ती या अनुवादातून मिळालीत, असे मानायला हरकत नसावी.
१. अनुवादातील शेवटचा परिच्छेद आणि त्याआधीच्या परिच्छेदातील वाक्यांवरूनच कळते की भगतसिंगांची फाशी टळावी, असे गांधीजींना मनापासून वाटतच नव्हते.
२. देशात खळबळ माजू नये म्हणून फाशी लांबणीवर टाका, असे सांगितले, पण रद्द करा असे सांगितले नाही. उलट तुम्ही ती रद्द कराल अशी मी अपेक्षा करीत नाही, आणि याबाबत तुम्ही काही उत्तर दिले नाही तरी चालेल, असे सांगून आयर्विन साहेबांना कसले उत्तरदायित्त्वही ठेवले नाही.
३. असे असताना नंतर २३ मार्च १९३१ च्या पत्रातील गुळमुळीतपणाबद्दल आणि त्यात वापरलेल्या कमकुवत भाषेतून जाणवणाऱ्या तळमळीच्या अभावाबद्दल आश्चर्य मुळीच वाटू नये. आणि गांधीजींना मनापासूनच ही फाशी रद्द व्हावीशी वाटत नव्हते, असा जो अंदाज मी बांधला होता, तो सत्य मानायला या अनुवादाने सबळ कारण दिले आहे. महात्म्याच्या तत्त्वज्ञानाबद्दल आणि साधनशुचितेबद्दल शंका नाही, पण या गलिच्छ राजकारणामुळे मात्र त्यांच्याविषयीच्या मनातील आदराला नक्कीच कधीही भरून न येणाऱ्या जखमेचे गालबोट लागले आहे, असे खेदाने म्हणावे लागते आहे.