आदरणीय आनंदघन,
तुमचा लेख आवडला.
"पूर्वीपासूनच मला सुध्दा अधून मधून कांही बाही लिहायची हुक्की यायची. उगाच प्रेरणा, ऊर्मी यासारखे मोठे शब्द वापरण्यात अर्थ नाही."
ही वाक्ये विशेष आवडली. विशेषतः दुसरे वाक्य माझ्या तबियतीशी जुळणारे आहे.
मनसबदारांची, मनसबदारीची चिंता न करता लेखनाचा सुभा सांभाळावा, असे मला वाटते. लेखनाची "हुक्की" आली की लिहून मोकळे व्हावे.लेखकांनी आधी लेखन करावे. प्रतिसादांची फारशी चिंता करू नये. असे मला वाटते.
लेखनाच्या गुणवत्तेशिवाय बरेचदा लेखनाचा विषय, लेखकाचे व्यक्तिमत्त्व, सहमनोगतींसोबत जुळलेली समीकरणे आदी गोष्टीदेखील प्रतिसादांना प्रभावित करत असते. प्रत्येक वेळी चांगल्या लेखनाला हवे तसे, हवे तेवढे प्रतिसाद मिळतीलच असे नाही. कारणे अनेक असू शकतात. पण चांगले लिखाण फार काळ दुर्लक्षित राहत नाही, असेदेखील मला वाटते.