मनोगतींनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल व मार्गदर्शनाबद्दल आभार.
कर्मण्ये वाधिकारस्ते ठीक आहे, पण इथे आपणच आपले कर्म ओढवून घेतलेले आहे. आपण बऱ्यापैकी लेखकू व्हायलाच पाहिजे असे समजण्याचे कांहीच कारण नाही.
कलाकृतीच्या निर्मितीचा स्वतःला मिळणारा आनंद ही एक वेगळीच चीज आहे. माझ्या मते प्रत्येकजण आपापल्या परीने तो घेत असतो. त्यासाठी ती निर्मिती प्रसिद्ध करण्याची आवश्यकता नसते. पण तरीही लेखकाला वाचक मिळावा, गवयाला श्रोता मिळावा, अभिनेत्याला प्रेक्षक मिळावा असे वाटतेच. त्यांच्या प्रतिसादाने आनंद मिळतो हे कोणीही नाकारत नाही. हा मानवी स्वभाव आहे.
भाईकाकांची गोष्टच वेगळी. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या बिर्ला मातुश्री सभागारमध्ये एकट्याने सर्वांना मंत्रमुग्ध करून ठेवण्याची त्यांची किमया मी पाहिली आहे.
माझ्यापुरते मी असे ठरवले आहे की १०० वाचने झाली तर ते लिखाण लिहून प्रसिद्ध केल्याचे चीज झाले असे समजावे. तशी झालेली असल्यामुळे मला आता आणखी लिहायला हरकत नसावी.