मृदुलांच्या प्रतिक्रियेतील एक भाग असा होता ज्यावर थोडीशी टिपण्णी कराविशी वाटली. (त्यांनी ब्रिटीशांबद्दल स्पष्टीकरण ही केले आहे, तरीपण कराविशी वाटली). त्या म्हणतात की, "...फाशी रद्द करता येत नाही, लांबणीवर टाकता येईल हे आयर्विनांचे म्हणणे कायद्याला अनुसरून असावे. आपल्या भारतीय कायद्यातही संसदेवर हल्ला केल्याबद्दल अतिरेक्यांना फाशीची शिक्षा झाली आहे. इंग्रजांच्या दृष्टीने भारत हा त्यांचा प्रांत होता व येथील हल्ले हे त्यांच्या सरकारवरचे हल्ले. इंग्रज हे प्रेमळ, अगदी न्यायाने वागणारे राज्यकर्ते होते असे मला मुळीच म्हणायचे नाही..."  

यामधे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे कि कायद्याला अनुसरून म्हणजे कोणाचे कायदे तर, घुसखोर ब्रिटिशांनी स्वतःची सत्ता प्रस्थापीत केल्यावर त्यांच्याविरूद्ध कोणि काही करू नये म्हणून केलेले कायदे. ते कायदे जालियनवाला बागेत मोठ्यांबरोबरच निष्पाप मुलाबाळांना बैसाखीच्या दिवशी हजारोच्या संख्येत मारताना लागू होत नाहीत. अगदी जेंव्हा ब्रिटीशराणी भारतभेटीसाठी १९९० च्या दशकात आली, तेंव्हा पण त्या स्मारकाला भेट द्यायचे टाळले आणि त्यांच्या पुर्वीच्या लोकांचे हे कर्म मानवतेच्या हकांना पायदळी तुडवणारे होते पण मान्य केले नाही. (अर्थात उत्तर न देऊन, उपेक्षेने).  अशा प्रकारच्या माफ्या ब्रिटिशांनी इतरत्र (विशेष्त: द. अफ़्रिकेत) मागितल्याचे ऐकिवात आहे.