१) वाचनसंख्या- कधी कधी आपले लिखाण प्रकाशित झाल्यापासून मुखपृष्ठावरून त्याचे शीर्षक नाहीसे होईपर्यंत फारच थोडी वाचने झालेली असतात व प्रतिसादही फार थोडे आलेले असतात. पण अचानक एक दोन महिन्यांनंतर वाचनसंख्या व प्रतिसाद वाढलेले दिसतात. याचे कारण बहुधा आपण इतरांच्या लिखाणावर ज्या प्रतिक्रिया देतो त्यावरून एखाद्या वाचकाला आपले मूळ लेखन वाचावेस ेवाटत असावे असे वाटते. त्यामुळे इतरांच्या लिखाणावर आपण प्रामाणिकपणे व विचारपूर्वक प्रतिसाद द्यावेत.
२) प्रतिसाद संख्या - आपल्या लिखाणावर (विशेषत: चर्चा विषयावर) प्रतिसाद किती येतात ते महत्त्वाचे नसून ते किती अभ्यासपूर्ण असतात ते महत्त्वाचे असते.प्रतिसादांचे ज्यास्तीत ज्यास्त प्रमाण वाचनसंख्येच्या पाच टक्के असते.त्यांतही काही प्रतिसाद वाचकांचे  वाचकांचे आपसांतील पिंगपाँग असते. प्रतिसादांची संख्या आपणही "धन्यवाद", "सहमत" अशा प्रतिक्रिया देऊन वाढवू शकतो व मुखपृष्ठावर आपले लिखाण मधून मधून झळकवू शकतो. पण प्रामाणिकपणे वाटल्याशिवाय स्व्त:च्या लिखाणावर असले उपप्रतिसाद देऊ नयेत
३) सवंगपणा, खोटा कळवळा, या गोष्टी टाळाव्यात. फार त्वेषाने व्यक्तिगत हल्ला करणाऱ्याचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू नये.