शेवटी सारीच करमणूक आहे. नाही का?
"शेवटी" हा शब्द एकदा आला की त्याच्यानंतर हवे ते आणि वाट्टेल ते म्हणता येते नाही?
शेवटी सगळी माया!
शेवटी सगळ्या जीवरासायनिक प्रक्रिया!
शेवटी माणसाचे जीवन काय आणि अळीचे जीवन काय, दोन्ही एकच, फक्त टाईमपास!
शेवटी सगळ्यांना मातीतच मिळायचे आहे!
शेवटी मानव जातीचा अंत हा ठरलेलाच आहे!
शेवटी प्रत्येक माणूस एकटाच असतो!
सगळेच जाणार शेवटी, फक्त राख उरणार दोन चिमटी! (घाशीराम कोतवाल)
.......... न संपणारी यादी.
पण, "तो"राव, आपण जगतो ते याच्या एक पायरी अलीकडे - अंती (अल्टिमेटली) नव्हे परांती (पेनल्टिमेटली).
कोणी कितीही जातिवंत "बाहेरचा" (आउट्सायडर) असला तरी त्याला शरीरधर्म, मनोधर्म, जीवनधर्म, लोकधर्म असतातच. येथे धर्म म्हणजे कर्तव्य असा अर्थ नसून टाळता न येण्याजोग्या संबंधित बाबी असा आहे.
इच्छेने किंवा अनिच्छेने, हळू हळू माणूस जीवनात गुंतून जातो, स्वत:चे जीवन बनवतो. जीवन निरर्थकच असते, पण माणूस त्याला आपापल्या परीने अर्थ देतो. आणि मग तो अर्थ त्याच्यासाठी करमणुकीपेक्षा अधिक महत्त्व धारण करतो.
अंती सगळी करमणूक हे मान्य, पण परांती तसे रहात नाही.
त्या त्या एका एका गोष्टीला त्याचे त्याचे महत्त्व प्राप्त होते. तरतमभाव निर्माण होतो. टाईमपासचा क्वालिटीटाईमपास होतो.
आपली चर्चा आहे ही त्या परांतभावातली, त्या अवकाशातली. "अंती" चा क्लास वेगळा, त्याविषयी चर्चा उद्भवत नाही, तिथे वाद संपतो - पण जीवन संपत नाही, तिथपर्यंत जातही नाही. असो.
टीका का करू नये याचे कारण आपल्यावर कोणी टीका करेल याची भीती हे नव्हे. तर "टु अंडर्स्टँड ईज़ टु फ़र्गिव्ह", एखादा असा का वागतो हे समजले की त्याला आपले मन आपोआप क्षमा करते/देते, हे तत्त्व. अर्थात याही बाबतीत मतमतांतर असणारच हेही मान्य.
शेवटचा मुद्दा: हॅम्लेटरावांचा प्रतिसाद सूक्ष्मदर्शकाखाली घालून मी जे म्हणालो त्याची प्रचीती येते की नाही ते पहावे.
दिगम्भा
[हॅम्लेटराव, क्षमस्व; ग़ालिबचा उपयोग मी वादासाठी केला ते आपल्याला रुचले नाही, इथे तर मी आपलाच उपयोग चर्चेसाठी/वादासाठी केला. चुकून या चर्चारूपी भाऊगर्दीत आपण सापडलात.
पण मोठ्या मनाने मला माफ़ करा, मी स्वत:ही ग़ालिबवालाच आहे.
(भावना दुखावल्याबद्दल दिलगीर),
दिगम्भा]