पहिल्या मुद्द्यावरची चर्चा आवडली. वाचून मजा आली.
--
संतांनी वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने का प्रयत्न केले नाहीत ?
संतांकडे वैज्ञानिक म्हणून न बघता विचारवंत म्हणून बघितले पाहिजे. त्या काळातही वैज्ञानिक झाले असतीलच. पण अस्थिर सामाजिक - राजकीय स्थितीमुळे त्यांना वाव मिळाला नसणार.
त्याची भिती, अस्वस्थता, असुरक्षिततेची भावना, स्पर्धात्मक वृत्ती कमी न होता वाढत आहे
असे मला वाटत नाही! भीती, असुरक्षितता तर नक्कीच कमी झाली आहे. स्पर्धात्मक वृत्ती भारतासारख्या दाट लोकसंख्येच्या प्रदेशात वाढणे साहजिक आहे. जर वैज्ञानिक प्रगती न होता लोकसंख्या 'पूर्वीप्रमाणे' आटोक्यात राहिली असती तर माणूस सुखी झाला असता काय? उलट सततच्या संघर्षामुळे, जिवलगांच्या मृत्यूंमुळे जास्त कष्टच नशीबी आले असते, नाही का?
संतांनी वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे होते हे मात्र पटत नाही. वैज्ञानिक प्रगतीसाठी राजकीय इच्छाशक्ती व स्थैर्य हवे होते. ते पाश्चिमात्य देशात होते आणि आपल्याकडे नव्हते इतकेच.