धन्यवाद लम्बोदरजी !
काही जणांना हा विनोद कळला नाही असे व्यनितून समजले.
अहो यात आहे काय ? अनेक वेळा कार्यक्रमात लोक ' आपण चार शब्द बोला' असे म्हणतात आणि बोलणारा तासभर तरी बोलत रहातो. म्हणून चार शब्द आणि हे न आवडणारे एक गुरुजी ( जे अनेकवेळा या प्रकारांमुळे त्रस्त होतात) हे खऱ्या अर्थाने चारच शब्द बोलतात आणि ते चार शब्द म्हणजे
१ आता
२ कार्यक्रम
३ संपला
४ आहे !
बराय मित्रांनो आता चारोळी न वाचता अर्थच वाचा, हाऽ हाऽ हाऽ .