प्रियाली, लेख फार छान आहे. बर्रीच माहिती मिळाली. एक शंका...

आख्यायिकेनुसार मृतात्म्यांना या दिवशी नवी शरीरे शोधायची संधी मिळत असे, त्यामुळे ते सर्व शरीरांच्या शोधात गावांत येत. हा दिवस वर्षातला असा दिवस मानला जाई (जातो) ज्यादिवशी आत्मे आपले जग सोडून मर्त्य मानवाच्या जगात सहज प्रवेश करू शकत (शकता).

आपला पितृपंधरवडापण याच काळात येतो आणि त्यामागे थोडीफार अशीच समजूत (पितर घरी जेवायला येणं) आहे. हा निव्वळ योगायोग असू शकतो?

थोडं विषयांतर होईल पण सांगतो. असच साम्य नोहा आणि मनू यांच्या कथेत पण आहे.  कोणी उलगडा करू शकेल? वाटल्यास वेगळी चर्चा सुरू करू..