कविता चांगली आहे.
"आला शिशिर संपत
पानगळती सरली
ऋतुराजाची चाहूल
झाडावेलींना लागली"
हीच कल्पना आपल्याही कवितेत आहे. ही कविता वैभव जोशी यांच्या कवितेवर आधारित असली तरी काही बदल सुचवावेसे वाटतात.
तो जेव्हा कुडकुडत हसतो तेव्हा
विषाद दाटे रानी
जाती पाने गळुनी
ती झाडे हुडहुड हुडहुड करती
ऋतु बदलला सारा
शिशिरी गोठे पारा
शिशिराचे तांडव रानी
वारा त्याचा साथी
ये निरोप देण्यासाठी
घरघरतो माझा मंद श्वास
मी जगून घेते थोडे
क्षणभरात सुटते कोडे
की त्याच्यामुळे हिमचादर ही
अजून पांढरी आहे
ती वितळेल तोवरी म्हणावे
हाच शिशिर आहे
बदल सुचवलेले चालतील म्हणून सविस्तर प्रतिसाद दिला आहे. आपण रागावणार नाही अशी आशा आहे.
पाने झडणे पेक्षा काव्यामध्ये पान गळणे हा अधिक योग्य शब्द वाटतो.
पहिल्या कडव्यात भांडारकरांनी सुचवलेल्या बदलात पाने हा बदल योग्य वाटतो पण 'गळणे' हा शब्द अधिक योग्य.
पानगळती हा रोग नाही, ती नैसर्गिक घटना आहे. दरवर्षी घडणारी.
"विषाद दाटे रानी " कसे वाटते पहा. यात मृत्यूची चाहूल हा अर्थ अभिप्रेत आहे.
हेमंत येतसे माझ्या गात्री
रेडा त्याचा साथी
ये निरोप घेण्यासाठी
कोणताही ऋतू झाडाच्या अंगी येत नसतो, शिवाय पान गळताना 'रेडा साथी' ऐवजी वारा तिथे असणे अधिक अर्थवाही आहे. हे आणि असेच इतर बदलही आपण तार्किकतेसाठी तपासून पहा. हेमंत आणि शिशिरात तापमानात नेमका काय फरक असतो ते जाणून आणखी बदल करता येतील. शेवटचे कडवे मनाला अधिक चटका देणारे करता येईल.