जातिव्यवस्थेवर बरंच लिहीता येईल. येथे थोडक्यात माझं मत मांडतो.

१) हिंदू धर्माचं अपयश आणि जातिव्यवस्थेचं यश सामावलं आहे ते जातीव्यवस्थेच्या उतरंडीत. येते प्रत्येकजण कुणाच्यातरी खाली मात्र कुणाच्यातरी वर आहे.

मी कुणाच्यातरी खाली असण्याचं शल्य , मी कुणाच्यातरी वर आहे (किंवा खरं तर कुणीतरी माझ्या खाली आहे) या सुखात विसरलं जायचं - जातंय.

आजची कित्येकांना आपल्या जातीचा विसर न पडण्याला हा अहं भाव कारणीभूत आहे.

अहो कुठलंही कर्तुत्व न गाजवता केवळ बापाचे नाव लावल्यामुळे मिळणारा मान , सोडवत नाही.

२) आताश्या निदान महाराष्ट्रात तरी समाजात वावरतांना जात तितकिशी महत्त्वाची राहीलेली नाही. मात्र अजुनही राजकारन , विशेषतः निवडणूका आणि लग्न या दोन जागी जात फार महत्त्वाची मानली जातेय. या दोन जागेवर जो पर्यंत जात महत्त्वाची आहे तो पर्यंत ही व्यवस्था टिकेल.

३) जातीय अभिमानाची निर्मीती म्हणजे जात मानसाला चिटकणे हे जन्मतः होते.

यावर आंतरजातीय विवाह झाल्यास जातीय अभिमानाला आळा बसेल अशी अपेक्षा आहे. तसेच जर का लग्नात जात महत्त्वाची न राहता कर्तुत्व महत्त्वाचे झाले तर आपल्या समाजाचे पर्यायाने भारताचे दिवस पालटतील.

म्हणून म्हणतो की शासन अश्या काही योजना राबवत असेल आणि त्या नव दांपत्याचं काही अशीं पालकत्व घेत असेल तर त्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे. काही लोकं चुकीची माहिती देऊन हे पैसे खातील अशी काळजी कशाला?

नीलकांत