१. अखंड भारताचे स्वप्न साकार करणे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? आपल्याला तो भूप्रदेश हवा आहे का ? तिथल्या जनते शिवाय?

२. सध्याच्या भारतातील इतर प्रांताबद्दल आपाण कितीशी आस्था दाखवतो? इथे विविध आपल्याच प्रांतांसाठी व अमेरिकेवरील माहिती साठी सदर काढून पहा प्रतिसाद! किती जण भारतातल्या इतर राज्यांतली ३ पेक्ष्या अधिक शहरे सांगू शकतात? अरेच्या ! तुम्ही AS ची तयारी तर करत नाही ना? तुम्हाला अमेरिकेतील राज्ये अधिक माहित आहेत कि ओरिसातील जिल्हे?

३ . उत्तर प्रदेश, बिहार व पुर्वोत्तरी राज्ये आपल्याच भारतात येतात ना? त्या "बिमारू" राज्यांमुळे "आपल्या" मुंबईवर पडणार्‍या ताणाच्या कंठशोषाचे काय? आपल्याच घरातील आजारी व्यक्तिंना आपण कशी वागणूक देतो?

४. राहता राहिले काश्मीर तो प्रश सोडवण्यास तेथील जनता समर्थ नाही काय? माझ्या मते भारताची (आपला?) काश्मीर मध्ये असलेली आस्था ही त्याचे सैनिक दृष्ट्या महत्व दर्शविते इतकेच.  एखाद्या देशाला स्वत:च्या देशात संयम राखावा यासाठी सैन्य ठेवावे लागावे?

५. दुर्दैवाने आपला भारत महाराष्ट्रातच संपतो! थोपलेल्या भारतीयत्वापेक्ष्या व्यक्तिस्वातंत्र्य महत्वाचे असे मला वाटते. नुसत्या सीमा वाढवण्यात कसला पुरुषार्थ (महिलांची माफी मागून) ? शिवाय वसुधैव कुटुम्बकम् म्हटल्यावर सीमारेषांवरून भांडण्यात काही अर्थ आहे का?

मी (अज्ञानी) आशुतोष