लिखाळ, खूपच छान कथा सांगितली आहे तुम्ही तर !
मला वाटतं की कधीकधी आपण वीटेला सोन्याचे महत्त्व देत असतो पण कधीकधी आपण सोन्यालाही वीटेचे महत्त्व देत असतो.. या दोहोंतून सुटका मिळवून खरी दृष्टी मिळवण्यासाठी गरज असते ती सुयोग्य मार्गदर्शनाद्वारे आपले 'पान रिफ्रेश' करायची !
भासमान सोने जपण्याच्या नादात आपण अनमोल सन्मित्रांकडे दुर्लक्ष करून चोराचिलटांचेच ध्यान करत बसतो. असे करू नये, हाही एक संदेश मिळाला.
लिखाळ, सुंदर बोधप्रद कथा उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.