हा फारच बुवा विनोदी प्रकार आहे. मला आधी असल्या गोष्टींचा राग यायचा, नंतर हळू - हळू यांच्या बुद्धीची कीव यायची, आणि आताशा खूप हसू येते. "शिवधर्म" म्हणजे काय? कठोर साधना कुठली? आणि त्या धर्मात जाऊन ही मंडळी काय उजेड पाडणार आहेत? त्या धर्मात प्रवेश करून लगेच यांच्या प्रवृत्ती बदलणार आहेत काय? म्हणजे दम - दाटी करणे, दादागिरी करणे, मारहाण करणे, नासधूस करणे, उगीच स्वतःचं महत्त्व वाढविणे, दारू ढोसून शिवचरित्राविषयी बोलणे, उगीच टर्रेबाजी करणे, सभ्य आणि सुसंस्कृत लोकांना त्रास देणे या त्रासदायक सवयी बदलणार आहेत काय? मुळात विचार शुद्ध नसतील तर असले छपन्न धर्म बदलून ही काही उपयोग होणार नाही. मला खात्री आहे, आणखी २० वर्षांनंतर अजून कुठल्याशा धर्माची टूम काढणार आहेत ही लोकं! "शंभूधर्म", मग अजून काही वर्षांनी, "जिजाऊधर्म" मग अजून कुठला तरी धर्म, पुन्हा अजून एक! बस, फक्त धर्मांतरच करत बसा. जग कुठे चाललयं आणि हे कुठे चाललेत. हास्यास्पद आहे हे सगळं. आणि मला हसू यामुळे अधिक येतं की यांच्या असल्या माकडचेष्टांमुळे कुणाला काहीही फरक पडत नाही. विशेषतः ज्या गटाला, जातीला (ब्राह्मणांना अर्थातच) हे टारगेट करतात, त्यांना तर यत्किंचितही फरक पडत नाही. नाही म्हणायला कुठेतरी दारू ढोसून कुणालातरी बुकलून काढलं तर फक्त कुठेतरी एक ओळ छापून येते, बस, एवढेच त्यांचे अस्त्तित्त्व!!

इतिहास सांगतो की वंदनीय, प्रातःस्मरणीय, पूज्य दादोजी कोंडदेव आणि आदरणीय, देवतुल्य श्री समर्थ रामदास यांच्यामुळेच शिवाजी महाराज घडले. या दोघांनी योग्य ते संस्कार शिवाजी महारजांच्या मनात रुजवले नसते तर शिवाजी महाराज या उंचीपर्यंत पोहोचलेच नसते. हे सिद्ध झाले आहे, सर्व इतिहास संशोधकांनी मान्य केले आहे, सर्व मान्यताप्राप्त संदर्भग्रंथांमध्ये नमूद केले आहे आणि ही मंडळी हे सत्य मोडीत काढायला निघाली आहे. काय म्हणावे या बालिशपणाला? उद्या मी जर म्हणालो की आपल्याला प्रकाश सूर्यापासून मिळतच नाही तर त्याला काही अर्थ असणार आहे का? माझ्या हटवादीपणामुळे सत्य बदलणार आहे का? नाही!! या सगळ्या मूर्ख कल्पनांचा स्त्रोत म्हणजे तो बिनडोक पुरुषोत्तम खेडेकर आहे. त्याला साथ देणारे आणखी कोण कोकाटे की कोण सारखे निर्बुद्ध! या लोकांचा स्वार्थ या सगळ्या दुही माजविणाऱ्या आणि विनाकारण मराठी समाजाला अधिक दुबळे करणाऱ्या कारवायांना प्रोत्साहन देतो. २५ वर्षांनी या मूर्खपणामुळे महाराष्ट्रातल्या सर्व मुख्य शहरांमधून मराठी माणूस हद्दपार झाला असेल, एवढी दूरदृष्टी ही या बेअक्कल लोकांना नाही. मग असेच कुठेतरी अमहाराष्ट्रीय लोकांपुढे हाजी - हाजी करत दिसतील हे लोकं! मग तिथल्या तिथे कुठे तरी आपली दादागिरीची हौस भागवून घेतील आणि कुणी चार - आठाणे फेकले की स्वतःच स्वतःला शाबासकी देत बसतील. हीच लायकी आहे यांची. किंवा कुणीतरी यांनाच बुकलून काढतील आणि हे जीव वाचवत पळत सुटतील. जाऊ द्या, करू द्या त्यांना काय करायचे आहे ते, आपलं मनोरंजन होत आहे ना, बस झालं!!

--समीर