ब्राह्मण सोडा हो. पण 'कांबळे' आडनाव आवडत नाही किंबहुना त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर 'घाण वाटते' म्हणून २-३ वर्षांपूर्वी आडनाव बदलून घेऊन 'साठे' असे केलेल्या एक शिक्षिका मात्र चांगल्याच परिचयाच्या आहेत.

यांत नवल ते काय? 'कांबळे' आडनाव लावणाऱ्यांचा स्वतःच्याच आडनावाबाबत असणारा रोष किंवा घृणा समजण्यासारखी आहे. त्यापेक्षा 'साठे' आडनावाच्या माणसाने नाव बदलून 'कांबळे' केले तर समजण्यासारखे आहे. तसे होत असावे असे वाटत नाही. कोणाला माहीत असल्यास नेमके कोणते फायदे मिळवण्यासाठी तसे केले हे अवश्य नमूद करावे.

गोरा रंग म्हणायचा झाला तर रंग कोणाचाही असू शकतो. अगदी मराठा, सोनार, कोळी कुणबीही. म्हणून गोरे-घारे असण्यामागचे कारण 'साती ताईंना माहीत आहे' तसेच असू शकते असे नाही. इतरही बरीच फिरंगी कारणे असू शकतात !

 अगदी खरं! आणि ही फिरंगी कारणे सर्वच घाऱ्या गोऱ्या लोकांच्या बाबतीत सत्य सावीत असा निष्कर्ष आपल्या आणि सातीताईंच्या विधानावरून काढता यावा.

तरीही सरकार जातीयवादास खतपाणी घालते असे वारंवार विधान सर्वत्र ऐकू येते त्यावर एक जालिम उपाय म्हणून आपापली आडनावे बदलून कोथरूडकर, अंधेरीकर, विरारकर अशी करूया. म्हणजे आडनावावरून कोण कोणत्या जातीचा ते कळणे कठीण होईल. किती जण तयार होतील या बदलाला?