यांत नवल ते काय? 'कांबळे' आडनाव लावणाऱ्यांचा स्वतःच्याच आडनावाबाबत असणारा रोष किंवा घृणा समजण्यासारखी आहे.
मला तरी या मागचे कारण समजत नाही आपण सांगितलेत तर बरे होईल.
हगवणे, शौचे(लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की हे आडनाव बाकी कुठल्या जातीत असते माहीत नाही पण को. ब्राह्मणांमधे मात्र असते) अशी आडनावे असलेल्यांनी आडनावे बदलली तर त्यात नवल नाही.
त्यापेक्षा 'साठे' आडनावाच्या माणसाने नाव बदलून 'कांबळे' केले तर समजण्यासारखे आहे.
यात काय समजण्यासारखे आहे ? तसे होत असावे असे वाटत नाही. कोणाला माहीत असल्यास नेमके कोणते फायदे मिळवण्यासाठी तसे केले हे अवश्य नमूद करावे.
मला तरी असे कोणी माहित नाही. कितीही गरीबी असली तरी अशा प्रकारे फायदा उठवावा असे कोणाला वाटत असेल असे मला तरी वाटत नाही. अर्थात एकही ब्राह्मण गरीब नसतो असे आपले म्हणणे असल्यास बोलणेच खुंटले.
मुळात 'साठे' असे आडनाव बदलूनही त्यांनी रोज अंगावर १०-१० तोळे सोने वागवतानाही सवलती घेणे थांबविले नव्हते हेही नमूद करावेसे वाटते कारण नेमके कोणते फायदे मिळवण्यासाठी असे आपण लिहिले आहे. त्यांना आडनावाची किंवा आडनावावरून जात समजून येण्याची लाज वाटत होती तर सुस्थितीत असतानाही सवलती घेण्याची लाज वाटत नव्हती ! मला वाटते नेमका हाच फरक असावा !
अगदी खरं! आणि ही फिरंगी कारणे सर्वच घाऱ्या गोऱ्या लोकांच्या बाबतीत सत्य सावीत असा निष्कर्ष आपल्या आणि सातीताईंच्या विधानावरून काढता यावा.
मला तरी या तुमच्या निष्कर्षात काही चुकीचे किंवा आक्षेप घेण्यासारखे वाटत नाही. अगदी फिरंगी नसले तरी दुसरी कुठलेतरी मूळ असण्याची शक्यता मी तरी मुळीच नाकारत नाही. माझा आक्षेप फक्त सातीताईंनी केलेल्या विधानावर होता कारण त्यात त्यांचा रोख कोणावर होता हे वेगळे सांगायची गरज नाही.