कितीही गरीबी असली तरी अशा प्रकारे फायदा उठवावा असे कोणाला वाटत असेल असे मला तरी वाटत नाही. अर्थात एकही ब्राह्मण गरीब नसतो असे आपले म्हणणे असल्यास बोलणेच खुंटले

एकही ब्राह्मण गरीब नसतो असे मी म्हटल्याचे आठवत नाही. गरीब-श्रीमंत प्रत्येक जातीत असतात. कोणाला म्हणजे नक्की कोणाला? साठ्यांना की कांबळ्यांना. जर साठ्यांना असेल तर वर आपण ५००-१००० रू. पोरी विकण्याचे (लग्न आणि सुविधा यासाठी) धंदे 'साठे' नक्कीच करणार नाहीत. समजा ते 'कांबळ्यांनी' केले तर कांबळ्यांच्या पोरीला 'साठ्यांच्या' घरात द्यावी लागेल. अशा परिस्थितीत साठे आडनाव लावणाऱ्या गृहस्थांना आंतरजातीय विवाह केल्याबद्दल सरकारकडून सुविधा मिळतात का याबाबत मी अनभिज्ञ आहे.

यात काय समजण्यासारखे आहे ?

मी सुधारणा केलेली असल्याने याचे उत्तर टाळते.

नेमके कोणते फायदे मिळवण्यासाठी

हे 'साठ्यांनी' नाव बदलून आरक्षण मिळवण्यासाठी 'कांबळे' केले असे कोणाच्या वाचनात आहे काय? सांगायचा मुद्दा हा की (ब्राह्मण सोडा) फारसे कोणीही 'तथाकथित' उच्च वर्णिय आपले आडनाव सोडून मागासवर्गिय आडनाव धारण करणार नाहीत असे वाटते. असे करणारे असल्यास त्यांची संख्या १००० त १ ही नसावी असा अंदाज आहे.

(अंदाजपंचे) प्रियाली

*साठे आणि कांबळे ही आडनावे वानगी आणि सोयी दाखल आहेत. एखाद्यास ती परूळेकर-जाधव, जोशी-खोब्रागडे, चित्रे-सुतार, भोसले-साळवे अशी वाचता येतिल.