अर्थात असल्या मूर्खपणामुळे देवतुल्य संत समर्थ रामदास आणि शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत सतत तेवत ठेवणारे निस्पृह श्री दादोजी कोंडदेव यांचे महत्त्व जरा ही कमी होत नाही. असल्या थिल्लर गोष्टींमुळे त्यांचे महत्त्व कमी व्हावे इतक्या त्या लहान व्यक्ती नव्हेत. चार-दोन कुदळीचे घाव घातल्याने लहान-सहान डोंगरांचा आकार कमी होऊ शकतो, हिमालयासारख्या महाकाय पर्वताचा नाही. या दोघाही विभूतींचे चरित्र, वृत्ती, भावना, निष्ठा, देवत्त्व वादातीत आहे. ते तसेच राहणार. असले उद्दाम, घमेंडी आणि दूरदृष्टीचा अभाव असलेले खेडेकर आणि अजून कोण कोण (नावे ही आठवत नाहीत यांची आणि हे निघाले सूर्यावर थुंकायला. काय धाडस असते एकेकाचे!) स्वतःचा स्वार्थ साधत आहेत. त्यांच्या माकडचेष्टांकडे लक्ष न देणेच श्रेयस्कर!!