आपापल्या अपत्याचे नाव दाखल्यात लिहितानाच बिनआडनावाचे लिहिले तर हळुहळू आडनावे गळून पडतील. अशी नावे असलेले पुष्कळ दक्षिण व उत्तर भारतीय लोक माझ्या परिचयाचे आहेत.

हे माझ्या सासऱ्यांनी फारा वर्षांपूर्वी केलेले आहे. मला वाटतं मनोगतावर माझे पूर्ण नाव बऱ्याच व्यक्ती जाणतात त्यावरून कल्पना यावी.

फायदा मात्र फारसा नाही. कारण जेथे तेथे 'म्हणजे तुम्ही नक्की कोण?' (कोण म्हणजे कोण जातीचे, कारण आम्ही कन्नड असे सांगून समोरच्या व्यक्तीचे एकदाही समाधान झाल्याचे माझ्या लक्षात नाही.) असा प्रश्न हमखास विचारला जातो.