विदर्भात मुसलमानी हिंदी नावाचा प्रकार आहे. या बोलीत एक विशिष्ट प्रकारचा हेल कायम ठेवून जगातील कुठल्याही भाषेतील शब्द बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. अर्थात त्यांच्यात असाच संवाद होतो. आणि हा संवाद सार्वजनिक स्थळि असेल तर इतरांचे मनोरंजन होते.
उदा. "मैने तेरेकू इस्कुटर लानेकू कया था ना? "
'वो बंद पडेली है । कितन्या किका मारके मै थक गया लेकीन वो इस्टर्टच नै हूयी।"
ही एक बोली आहे. यात हेल महत्त्वाचा आहे. आणि अपभ्रंष हे वैशिष्ट्य.
वैदभीय बोली म्हणजेच वऱ्हाडी बोलीत सुद्धा अनेक अपभ्रंश आहेत. खरंतर बोलीत अपभ्रंश जास्त असतात. (येथेच निर्माण होतात असं म्हणा हवं तर) महाराष्ट्रातील प्रत्येक बोलीत असा प्रकार दिसतो.
मात्र तरी प्रत्येक बोलीचा एक विशिष्ट हेल असतो. तो काय ठेवूनच कुठलाही अपभ्रंश होत असावा. अर्थात ही सहज होणारी प्रक्रिया आहे.
---------------------------------------------------
विकी साहेव विद्रोहींवर चिडलेले दिसतात, किंवा त्यांच्या साहित्याचं सखोल वाचन सुरु झालेलं दिसतं. नेमकं काय झालं ते कळेल का?
नीलकांत