असे का? दूर असो वा जवळ त्सुनामीची तरंगलांबी समुद्राच्या खोलीवरून नाही का ठरणार?

--------- त्सुनामीचा वेग हा समुद्राच्या खोलीवर अवलंबून असतो. खोल समुद्रातून त्सुनामी वेगाने वाहते, उथळ पाण्यात कमी वेगाने वाहते. किनाऱ्यापाशी समुद्र उथळ असतो तर जसजसे किनाऱ्यापासून दूर जावे तशी खोली वाढते. त्यामुळे दूरवर घडलेल्या भूकंपामुळे त्सुनामी निर्माण झाली तर ती जास्त काळ खोल पाण्यातून वाहते, परिणामी तिचा वेग प्रचंड वाढतो. ती किनाऱ्याजवळ आली की किनाऱ्यालगतचे पाणी त्सुमानीच्या पाणभिंतीवर चढत जाते आणि समुद्र आटल्यासारखा होतो. पण दूरवरून येणारी त्सुनामी वेगवान असल्यामुळे समुद्राचे पाणी आटणे आणि किनाऱ्यावर त्सुनामी येणे ह्यादरम्यान मोठा काळ जात नाही. मात्र किनाऱ्याजवळ भूकंप झाला तर त्सुनामी त्यामानाने कमी खोलीच्या पाण्यातून प्रवास करत असल्यामुळे तिचा वेग कमी असतो. त्यामुळे समुद्र आटणे आणि त्सुनामी किनाऱ्यावर येणे ह्यादरम्यान थोडा जास्त कालावधी जातो. अजूनही मला माझे म्हणणे स्पष्ट मांडता आले नसल्यास सांग. मी पुन्हा प्रयत्न करेन.