मी उपस्थित केलेल्या चर्चेच्या प्रतिसादावरून ५०,००० रु. आंतरजातीय विवाहास उत्तेजन म्हणून देणे यावर बऱ्याच जणानी अनुकूल प्रतिकूल मते नोंदवली.पण त्यामुळे जातीयवाद कमी कसा होणार यावर कोणाला काही सांगता आले नाही.कारण हा उपाय त्यासाठी नाहीच.केवळ जातिभेदनिर्मूलनासाठी आपण काहीतरी करतो हे दाखवण्याचा दिखाऊ प्रयत्न आहे. प्रत्येकाने आपला धर्म आणि जात याचा उल्लेख कोणत्याही कारणासाठी आपली माहिती देताना करणे गुन्हा मानावा (आरक्षणाच्या संदर्भात सोडून).आडनावावरून जाती ओळखता येतात हे काहीच प्रमाणात खरे आहे पण तीही शक्यता टाळायची असल्यास आडनावे वापरण्याचा आग्रह सोडून द्यावा.पण मूळ प्रश्नाला हात न घालता वरवर मलमपट्टी करण्यातच समाधान मानणाऱ्या शासनाकडून ही अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे.