गझलेची जमीन वेडीवाकडी आहे. प्लॉट आ़डवा-तिडवा आहे. त्यामुळे सहजता नाही.
गाडीला अचानक करकचून ब्रेक लावल्यासारखी प्रत्येक ओळ लघूवर थांबते. आणि त्या लघूचा नंतर विसर पडू शकतो अशी एकंदर वृत्ताची लय. त्यामुळे ओढाताण साहजिक. असो.
कवयित्रीने गझलेला गंभीरपणे घ्यायला हवे. घेतल्यास उत्तम गझला होतील ह्यात शंका नाही.:) ताई, जे चांगले लिहितात त्यांचे पाडकामदेखील चांगले असते. असो.
कुमाररावांनी सुचवलेला बदल चांगला आहे. सागर यांचे निरीक्षण बरोबर. पगाराची द्विपदी चांगली आहे.
चित्तरंजन